स्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेत माझ्या "रानमोगरा" या ब्लॉगला पुरस्कार मिळाला. या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
दिनांक १४ डिसेंबर २०१० ला वर्धा येथील नामदेव सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, शेतकरी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष श्री रवीभाऊ देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अॅड.वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला.
कार्यक्रमाचा वृतांत पाहण्यासाठी आणि मा. शरद जोशी व मान्यवरांचे भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा.
दि.१२-०१-२०११ ला आयबीएन-लोकमत वाहिनीवर ’आजचा सवाल’ या कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या "वाढत्या महागाईसमोर सरकार हतबल झालंय का?” या विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेत शरद जोशी, हेमंत देसाई, प्रा. संजय चपळगांवकर आणि अजित अभ्यंकर यांनी भाग घेतला. त्याचर्चेचे मुख्य अंश....
अतिवृष्टी,अवकाळी पाऊस आणि दुष्काळी स्थितीमुळे कांदा उत्पादन कमी आले. शेतकर्यांचा खर्च भरून निघण्यासाठी कांद्याला प्रति किलो १०० रु. भाव मिळायलाच हवे असे प्रतिपादन शेतकर्यांचे पंचप्राण मा. शरद जोशी यांनी स्टार माझा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले. या मुलाखतीत त्यांनी १९८० ते २०१० असा शेतकरी संघटनेचा प्रवास आणि
आर्थिक व राजकिय उपलब्धी यावर सविस्तर विवेचन केले.
तेव्हा चला ऐकूया स्टार माझा टीव्हीला दिलेली मुलाखत.
मुलाखत प्रसारण दि. - २२-११-२०१० वेळ - रात्री ७.३०