Thursday, January 20, 2011

संभाजी ब्रिगेड-मनसे वादात शेतक-यांचे हित नाही


संभाजी ब्रिगेड-मनसे वादात शेतक-यांचे हित नाही
20 Jan 2011, 0416 hrs IST

म. टा. वृत्तसेवा  धुळे

         राज्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या जास्त असताना शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, यासाठी संभाजी ब्रिगेड कधीच रस्त्यावर आली नाही. शिवाजी महाराजांचा कैवार घेतलेल्या या संघटनेला, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका अशी तंबी शिवरायांनी दिली होती, या गोष्टीचा विसर पडला आहे. संभाजी ब्रिगेडने एकदा बाजार समितीत शेतकऱ्यांची कशी लूट होते, हे बघून घ्यावे, असा सल्ला शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवि देवांग यांनी दिला आहे.

        संभाजी ब्रिगेड आणि मनसे यांच्या वादात बहुजनांचा आणि पिळवणूक होणाऱ्या मराठीभाषिक शेतकऱ्यांचा फायदा नाही. या अस्मितेच्या वादामुळे जनसामान्यांचे आथिर्क प्रश्न मागे पडतात. शहरातील ग्राहकांची चळवळ आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चळवळ मागे पडते, असे देवांग यांनी खडसावले आहे. मराठा आणि मराठेतर अशी जातीय तेढ शेतकऱ्यांचाच चेंदामेंदा करणारी आहे. त्यात ४० टक्के शेतकरी मराठाच असतील. संभाजी ब्रिगेडने हा विचार विवेकपूर्व करावा, असे देवांग यांनी सुचवले आहे.
(महाराष्ट्र टाईम्स वरून साभार )
............................................................

Wednesday, January 19, 2011

कार्यकारीणीची बैठक

१८ जानेवारी २०११ ला अकोला येथे कार्यकारीणीची बैठक संपन्न झाली.



Thursday, January 13, 2011

आयबीएन-लोकमत चर्चा

स्टार TV-ब्लॉग माझा-Vdo



स्टार माझा TV-ब्लॉग माझा-
                      स्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेत माझ्या "रानमोगरा" या ब्लॉगला पुरस्कार मिळाला. या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
                    ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.

रानमोगरा

............................................................................................
                                    दिनांक १४ डिसेंबर २०१० ला वर्धा येथील नामदेव सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, शेतकरी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष श्री रवीभाऊ देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला.
कार्यक्रमाचा वृतांत पाहण्यासाठी आणि मा. शरद जोशी व मान्यवरांचे भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा.


......

......


......

......


............................................................................................


आयबीएन-लोकमत चर्चा


                  
दि.१२-०१-२०११ ला आयबीएन-लोकमत वाहिनीवर ’आजचा सवाल’ या कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या "वाढत्या महागाईसमोर सरकार हतबल झालंय का?” या विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेत शरद जोशी, हेमंत देसाई, प्रा. संजय चपळगांवकर आणि अजित अभ्यंकर यांनी भाग घेतला. त्याचर्चेचे मुख्य अंश....






............................................................................................

नागपुरी तडका - अभिवाचन

1) बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका


............................................................................................
.
2) छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं : नागपुरी तडका





............................................................................................

1)  मेथीची भाजी-शिवा



............................................................................................

2)  कोंबडी पळाली तंगडी धरून-शिवा



............................................................................................